9 Feb 2026, Mon
HEADLINES
आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतीक्षा नगर परिसरातील राजकीय स्थितीबाबत विश्लेषकांचा आढावामुंबई, प्रतिनिधी :आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतीक्षा नगर परिसरातील राजकीय वातावरणात महत्त्वाचे बदल घडताना दिसत आहेत. स्थानिक पातळीवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कृती समितीचा वाढता प्रभाव लक्षवेधी ठरत असून, आगामी निवडणुकीत ही समिती निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.गेल्या काही महिन्यांपासून संबंधित समितीने परिसरातील नागरी समस्यांवर सातत्याने कार्य केले असून, पाणीपुरवठा, स्वच्छता, मूलभूत सुविधा तसेच नागरिकांच्या विविध मागण्यांबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समितीबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.मतदारांच्या भावना आणि स्थानिक गरजांचा विचार करून समिती कोणत्या उमेदवारांना पाठिंबा देणार, याकडे सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे. समितीचा पाठिंबा मिळणारा उमेदवार आगामी निवडणुकीत आघाडीवर राहू शकतो, असे मत राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.प्रतीक्षा नगर परिसरातील विविध सामाजिक गटांचे प्रतिनिधित्व करणारी ही समिती कोणता निर्णय घेते, यावर निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या स्थानिक राजकीय नेते व पक्ष समितीच्या भूमिकेवर बारकाईने नजर ठेवून असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सह निबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणी व व्यवहारात दलालांचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप

सह निबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणी व व्यवहारात दलालांचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप

नोंदणी व मुद्रांक विमान सह दुय्यम निबंधक वर्ग-२. कार्यालय पनवेल क्रमांक

पनवेल – सह निबंधक क्र. २. २ व ५ तसेच १ व ४ कार्यालयांमध्ये दस्त नोंदणी, विक्रीखरेदी व्यवहार तसेचा इतर दैनंदिन कामकाजासाठी नागरिकांनी थेट कार्यालयात येणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मात्र दलालांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती व हस्तक्षेप दिसून येतो.

दस्त नोंदणी प्रक्रियेमध्ये दलालांचा सहभाग इतका वाढला आहे की, नागरिकांना थेट प्रक्रिया समजून घेण्याऐवजी दलालांच्या माध्यमातूनच काम करण्याची सक्ती होऊ लागली आहे. यामुळे अतिरिक्त आर्थिक बोजा तर पडतोच, पया प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियमाप्रमाणे, कोणताही दस्त किंवा व्यवहार नोंदणीसाठी नागरिकांना थेट सह निबंधक कार्यालयात जाऊन अर्ज व दस्त स्वादर करता येतात. यासाठी शासनाने आवश्यक ती यंत्रणा आणि माहिती अधिकार कायद्यांतर्गत अधिकारी नेमले आहेत. मात्र तरीही कार्यलयाच्या परिसरात दलालांचे वर्चस्व वाहत असून, काही वेव्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संमतीने ही मध्यस्थी होत असल्याचे आरोप देखील आहेत.

नागरिकांचे म्हणणेः सरळ काम करायचे म्हटले तरी

कर्मचारी असुऱ्या माहितीचा हवाला देऊन काम लांबवतात. मग शेवटी दलालच पर्याव उरतो, असे एका स्थानिक नागरिकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

कारवाईची गरजः या प्रकारांमुळे सह निबंधक कार्यालयातील कार्यपद्धतीवर नागरिकांचा विश्वास कमी होत चालला आहे. संबंधित प्रशासकीय अधिका-यांनी या दलालगिरीवर कठोर उपाययोजना करणे, तसेच नागरिकांना थेट सेवा देण्यासाठी सजग प्रणाली निर्माण करणे ही काळाची गरज आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतीक्षा नगर परिसरातील राजकीय स्थितीबाबत विश्लेषकांचा आढावामुंबई, प्रतिनिधी :आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतीक्षा नगर परिसरातील राजकीय वातावरणात महत्त्वाचे बदल घडताना दिसत आहेत. स्थानिक पातळीवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कृती समितीचा वाढता प्रभाव लक्षवेधी ठरत असून, आगामी निवडणुकीत ही समिती निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.गेल्या काही महिन्यांपासून संबंधित समितीने परिसरातील नागरी समस्यांवर सातत्याने कार्य केले असून, पाणीपुरवठा, स्वच्छता, मूलभूत सुविधा तसेच नागरिकांच्या विविध मागण्यांबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समितीबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.मतदारांच्या भावना आणि स्थानिक गरजांचा विचार करून समिती कोणत्या उमेदवारांना पाठिंबा देणार, याकडे सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे. समितीचा पाठिंबा मिळणारा उमेदवार आगामी निवडणुकीत आघाडीवर राहू शकतो, असे मत राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.प्रतीक्षा नगर परिसरातील विविध सामाजिक गटांचे प्रतिनिधित्व करणारी ही समिती कोणता निर्णय घेते, यावर निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या स्थानिक राजकीय नेते व पक्ष समितीच्या भूमिकेवर बारकाईने नजर ठेवून असल्याचे चित्र दिसून येत आहे.